नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण रत्नागिरी जिल्हा विषयी रोचक तथ्त व त्याचे मनाला लोभणार सौंदर्य
याच्या विषयी जाणुन घेणार आहोत.
आपल्या महाराष्ट्रातील 36 जिल्हा पैकी हा 28 नंबरचा जिल्हा म्हणजे
रत्नागिरी. रत्नागिरी जिल्हा हा शेतीप्रधान असुनच हा जिल्हा खुप सुंदर व
विलोभनिय असा जिल्हा आहे. हा जिल्हा अरबि समुद्राला लागुण असणारा जिल्हा आहे. रत्नागिरी
मिरकवाडा या ठिकाणी उत्तम सुंदर नैसर्गिक बंदर असलेला हा जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्राच्या
दक्षिण दिशेला पश्चिमी भागात स्थिर आहे. रत्नागिरी
जिल्हात एकुण 9 तालुके आहेत. 1) मंडणगड 2) दापोली 3) खेड 4) गुहागर 5) चिपळुन 6) रत्नागिरी 7) संगमेश्वर 8) लांजा 9) राजापुर
सर्वात वरती उत्तरेला मंडणगड व खाली दक्षिणेला राजापुर तालुका स्थित आहे. रत्नागिरी
जिल्हा हा लोकमान्य ठिळक,
भारतरत्न महर्षी केशव धोंडु कर्वे, कवि केशव सुत, भारतरत्न पांडुरंग वामन काने, स्वातंत्र्यवीर
सावरकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशे अनेक थोर रत्नांची जन्म भुमिला रत्नागिरी असे नाव पडले आहे.
या
जिल्हाच्या उत्तर दिशेला रायगड जिल्हा आहे, तर उत्तर पुर्व दिशेला सातारा जिल्हा, पूर्व
दिशेला सांगली जिल्हा, दक्षिण पूर्व दिशेला कोल्हापुर जिल्हा आणी दक्षिण दिशेला सिंधुदुर्ग जिल्हा स्थित आहे. हा जिल्हा फक्त सौंदर्यासाठीच
प्रसिद्ध नसुन तांत्रिक व पंचपक्वानासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
या
जिल्हात लोकांच्या प्रवासासाठी विमानतळ, बस स्थानक व रेल्वे स्थानक आहे. लोकांच्या
सोयिसुविधेसाठी D-mart व Reliance, किराणा दुकाने व इतर दुकाने सुद्धा आहेत.
रत्नागिरी
जिल्हातील प्रमुख पदार्थांमध्ये पुरणपोळी, कोंबडी वडे, चिकन राईस, फिश कडी, फिश फ्राय
हे प्रसिद्ध आहेत.
रत्नागिरी
जिल्हया मधील लोकांचा शेती, मासेमारी आणि नारळ, पोफळी, कोकम व आंब्याच्या बागा हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. रत्नागिरीचा सुप्रसिद्ध हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे.
2011
च्या झालेल्या जनगणना नुसार रत्नागिरी जिल्हाची एकुण लोकसंख्या हि 1,696,777 येवढी आहे. या जिल्हाची
साक्षरता ८६% पुरुष व ८७% स्त्रिया आहेत. या जिल्हाचे मुख्यालय ( मुख्य कचेरी ) रत्नागिरी
तालुक्यामध्ये आहे. रत्नागिरी शहर हे पुर्ण पणे डोंगराच्या खालोखाल वसलेल असुन रत्नागिरी
हे शहर १६.९८ उत्तर अक्षांश व ७३.३ पूर्व रेखांशावर
आहे. 11 मीटर समुद्रसपाटीपासुन उंच रत्नागिरी जिल्हा आहे. या 167 किमी. लांबीचा समुद्र
किनारा या जिल्हाला लाभलेला आहे. ज्यामध्ये अनेक मनोरंम्य किनारे व किल्ले आहेत.
रत्नागिरी
जिल्हातील किल्यांविषयी जाणुन घेयच म्हटले तर या जिल्हात असलेले 5
प्रसिद्ध किल्ले.
1 जयगड किल्ला :- जयगड हा किल्ला 16 व्या शतकामध्ये विजापुरच्या सुलतानाने बांधला होता. आणी कान्होंजी आंग्रे यांनी याला पुर्नविकास केला. हा किल्ला पश्चिम समुद्र मार्गावरुन व्यापार करण्यासाठि व त्याची देखरेख करण्यासाठी बांधण्यात आला होता. हा किल्ला पश्चिम किना-यावरील प्रमुख बंदरापैकी एक मानला जातो.
2) रतनदुर्ग किल्ला :- रत्नागिरीमधील
लोकप्रिय किल्लांपैकी हा एक किल्ला आहे. हा किल्ला बहमनी सुलतानि निर्माण केला होता.
1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहाच्या ताब्यातुन स्वराज्यात
घेतला या किल्लाच्या मधोमध भगवती देवीचे मंदीर असल्यामुळे या किल्लाला भगवती देवी किल्ला
सुद्धा म्ह्टले जाते. या किल्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे सुंदर दिपस्तंभ ( Light
House ) सूर्यास्त झाल्यावर अरबी समुद्राचे दिपस्तंभ सुंदर दृश्य सादर करते.
3) पुर्णगड किल्ला : - पुर्णगड हा 1724 मध्ये का कान्होंजी आंग्रे यांनि
बांधला होता. 1818 मध्ये पेशव्यांचे राज्य संपल्यावर हा किल्ला ब्रिटिशांच्या आपल्या
ताब्यात घेतला. हा किल्ला आकर्षित असण्याचे कारण म्हणजे या गडावर केले गेलेले कोरिव
काम छायाचित्र.
4) मंडणगड
किल्ला :- मंडणगड किल्ला हा सर्वात लहान किल्ला असुन हा किल्ला संरक्षणासाठी बांधण्यात
आला होता. मंडणगड किल्ला हा खेड, दापोली तालुक्यापासुन 42 कि.मी. लांब आहे. या किल्याचे
आकर्षण म्हणजे तेथे असलेले भव्य सौदर्य तलाव, आणी शिवकालीन जमिन खोदुन काढलेली तोफ
हे आहे.
5 ) सुवर्णदुर्ग किल्ला : सुवर्णदुर्ग हा किल्ला कोकणातील हर्णे या ठिकाणी
अरबिसमुद्रातील खडकाळ बेटावर स्थित आहे. हा किल्ला 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजाने
बांधला होता. हा किल्ला शत्रुच्या हल्लापासुन वाचण्यासाठी व मुकाबला करण्यासाठी बांधण्यात
आला होता. या किल्ल्याचे वैशिष्ट्ये म्हणजे भिंतीवर कोरलेले हनुमानाचे कोरीव काम आणि अग्रगण्य
पायऱ्यांपैकी एका पायरीवर कोरलेले कासव दिसते.
रत्नागिरी जिल्हाचे खासियत वैशिष्टे :-
1)
आरे-वारे समुद्रकिनारा :- रत्नागिरी मधेल जुळे समुद्र
आरे आणी वारे जे एकमेकांना मिळुन सौंदर्याची अनुभुती दाखवतात. हा समुद्र किनारा शांत
व स्वच्छ समुद्र किनारा आहे. जो अतिशय सुंदर लोभनिय दिसतो.
2)
रत्नागिरी समुद्रकिनारा :- रत्नागिरी समुद्रकिनारा हा चांदि सारखी वाळु शांत पाण्या बरोबरच समुद्राच्या लाट आणी पर्यटकांसाठी
आरामदायक माहौल साठी प्रसिद्ध आहे.
3) धमापूर,
मालवण
4) कोकण
रेल्वे
5)
कान्होजी
आंग्रे पुतळा रत्नागिरी : कान्होजी आंग्रे मराठा
साम्राज्याचे सर्वप्रथम सेनानाईक
6) रत्नागिरी
वेळणेश्वर
7) देवी
भगवती मंदिर, ( रत्नदुर्ग किल्ला)
8) टिळक
स्मारक
9) टिळक
संग्रालय
10) पतित पावन मंदिर
11) थिबा पॅलेस : प्राचिन राजवाडा
12) दिपस्तंभ
13) भगवती
बंदर
14) भाट्ये
चौपाटि
15) काळा समुद्र
16) गेटवे ऑफ रत्नागिरी
17) ॲक्वा वाईल्ड वॉटर
18) पतित पावन मंदिर
19) त्रिमुख मंदिर
20) लोटेश्वर मंदिर
रत्नागिरी जिल्हातील प्रमुख नदि :- रत्नागिरी जिल्हात एकुण 41 नदी आणि तलाव आहेत. त्यापैकी प्रमुख 11 नदी पुढिलप्रमाणे..
वशिष्टि नदि
रत्नागिरी नदी
जगबुडी नदी
जोग नदि
शास्त्री नदि
बाव नदि
सप्तलिंगि नदी
सोनावी नदी
सावित्री नदी
मुकचुंडी नदी
जैतापुर नदी
या प्रमुख नदी सहयाद्रि पर्वतांमधुन वाहत पश्चिमेला
प्रवाह करत अरबि समुद्राला जावुन मिळतात.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box